Friday, October 23, 2009

गाणं

खाणं आणि गाणं या दोन गोष्टी मला फार, फार, फार आवडतात. गाण्याचे कार्यक्रम ऐकायला मला खुप आवडायचं. आज काल वाटतं की या गाण्याच्या कार्यक्रमांची अती परिचयात अवद्न्या झाली आहे. इचलकरंजी ला असतना गणपतीत, दिवाळी पाडव्याला वैगरे असे कार्यक्रम व्हायचे. आता पण होतात. स्थानिक कलाकार हे कार्यक्रम करतात. अशा कार्यक्रमात सूत्रसंचालन करणारे असतात. जर हा सूत्रसंचालक चांगला असेल तर कार्यक्रम एकदम सहीही.. होतो. माझ्या सारख्यां लोकाना गाणं समजुन घेण्यासाठी अशा सूत्रसंचालकांची खूप मदत होते. माझ्या सारखे लोक म्हणजे त्याना गाणं आवडतं पण त्यातलं exactly काय आवडतं हे समजत नाही, म्हणजे मला जुनी गाणी आवडतात, मला A. R. Rehman ची गाणी आवडतात, मराठी मध्ये सुधीर फडकेंची गाणी आवडतात, अर्थपुर्ण गाणी आवडतात. पण problem हा आहे कि काही गाण्यांचा अर्थच कळत नाही. मग कोणी हे गाणं जरा समजावून सांगीतलं की ते गाणं खुप आवडतं.
मला आठवतं, मी एका गाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते. इचलकरंजीच्याच एका ग्रुप चा कार्यक्रम होता. कार्यक्रम एकदम रंगात आला होता. एक गाणं संपलं सूत्रसंचालकांनी कार्यक्रम पुढे सुरु केला.(मला जसं आठवतं तसं मी सांगायचा प्रयत्न करते.)
"सुधीर फडकेंचं HMV बरोबर असणरं contract संपत आलं होतं. दोन गाणी राहिली होती. त्यांना ती दोन गाणी खुप छान करायची होती. त्यांनी शान्ता शेळकेंना गाणं लिहिण्याची विनंती केली. त्या गाण्याची situation अशी होती, आयुष्याच्या संध्याकाळी तो आणि ती एकमेकांना भेटली आहेत. तरूणपणी ते दोघे जिथे भेटत असत तिथेच ते भेटलेले आहेत. त्यावेळी सारखीच निरव शांतता आहे, तसंच चांदणं आहे, सगळं सगळं तसंच आहे, फक्त ते प्रेम नाही. त्या वेळी जी भावी आयुष्या बद्दल स्वप्न पाहात, ती आता डोळ्यात नाहीत, त्या हळव्या भावना नाहीत.
हे सांगितल्या नंतर गाणं सुरू झालं आणि अनेकवेळा ऐकलेलं गाणं, मी नव्याने ऐकलं


तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी !

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी

सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ?
मीहि तोच तीच तूहि प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी