Saturday, August 30, 2008

तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊस हि!!!!

कोऽहं च्या ब्लॉग वरचं भांडण वाचुन, मला हे आठवलं
अमृता : आज उशीर झाला?
मी : होय
अमृता : काय झालं मूड खराब आहे वाटतं?
मी : नाहि गं..
अमृता : ह्म्म..
मी : आधी ते गाणं बंद कर, थकुन घरी आल्यावर असली गाणी ऐकवू नको.
अमृता : का? मला आवडतं.
मी : काय तर गाणं, मला असली गद्य गाणी आवडत नाहित.
अमृता : मला आवडतात.
मी : मग मी कंपनी मध्ये गेल्यावर लाव!
अमृता : तुच जातेस का? मी नाहि का जात? मला पण office आहे.
मी : काय गाणं "मी कांदा झालो नाहि, आंबा हि झालो नाहि" , कसं गं तुला आवडतं?
अमृता : पसंद अपनी अपानी, खयाल अपना अपना. ताई पुढचं गाणं ऐक तुला पण खुप आवडेल.
मी : मी म्हटलं ना मला हि गाणी आवडत नाहित
अमृता : तु ना जुन्या जमान्यातली असल्या सारखी वागतीस बास झाले आता सुधीर फडके ऐकणं.
मी : यात जमाना कुठे आला? काहिहि बोलायच का? शब्द, चाल या मुळं मला त्यांची गाणी आवडतात. आल्या आल्या भांडु नको. या गाण्याला काहि अर्थ आहे का? तुच सांग.
अमृता : पुढचं गाणं ऐक त्यात तुला चाल, शब्द सगळं मिळेल, सरसकरट सगळ्याला नावं ठेउ नको.
मी : मी फ्रेश होउन येते, चालु दे तुमचं, ऐकु नको कधिहि.
.................
(ओ ओ हे गाणं ऐक म्हणत होती तर अमर.)
मी : ए ए हे कुठलं गाणं company मध्ये एका कलिग चा हा ring tone आहे.
अमृता : आता का?
मी : सांग ना, सांग ना...
अमृता : आता लाईट आल्यावर ऐक, छान गाणं आहे. "तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊस हि"
मी : छान आहे!!!!!
अमृता : ऐकावं कधीतरी लहान बहिणीचं.